शरीफ, मुनीर त्यांची चिनी विमाने रहीम खान विमानतळावर उतरवणार का?   

असदुद्दीन ओवेसी यांचा टोला 

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर हे आता त्यांची भाडेतत्त्वावरील चिनी विमाने रहीम यार खान एअरबेसवर उतरवू शकतील का? असा उपहासात्मक टोला एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी समाज माध्यमावर लगावला आहे. यावेळी त्यांनी चीनवरही निशाणा साधला आहे.
 
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहीम यार खान एअरबेसवर भारताने लष्करी हल्ला केल्यानंतर एअरबेसवरील धावपट्टी एका आठवड्यासाठी बंद करण्यात आली आहे. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यामुळे ही धावपट्टी उद्ध्वस्त झाली आहे. यावरूनच ओवेसी म्हणाले, भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी १० मे रोजी सांगितले, की चीन पाकिस्तानचे सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य राखण्यासाठी पाकिस्तानबरोबर उभा राहील. त्यावरून ओवेसी यांनी या दोन्ही देशांवर निशाणा साधला आहे. जोपर्यंत पाकिस्तान भारताच्या विरोधात दहशतवादासाठी त्यांच्या भूमिचा वापर करत राहील, तोपर्यंत स्थिरता आणि शांतता शक्य नाही. शस्त्रविराम होवो किंवा न होवो, पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असणार्‍या दहशतवाद्यांचा पाठलाग करणे भारताने सोडू नये, असे असदुद्दीन ओवेसी यांनी स्पष्ट केले.
 

Related Articles